या संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. नागरिकांना ग्रामपंचायतीच्या योजना, सेवा व उपक्रमांची अचूक आणि पारदर्शक माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे.
ग्रामविकासासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य व डिजिटल सेवा यामध्ये सातत्याने सुधारणा करणे हे ग्रामपंचायतीचे ध्येय आहे.
गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व जन्म प्रमाणपत्र प्रदान केले जाते.
गावाच्या हद्दीत मृत्यू झाल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते.
विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणीची सेवा ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्यात येते.
ग्रामपंचायत करांची कोणतीही थकबाकी नसल्यास थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.